सेंद्रिय शेतीमध्ये विविध प्रकारच्या खाद्य तसेच अखाद्य तेलबियांच्या पेंडींचा वापर अन्नद्रव्यांचा नैसर्गिक स्रोत म्हणून केला जातो. या तेलबियांमधील अन्नद्रव्यांसोबतच त्यामध्ये असलेले किड व रोगप्रतिकारक गुणधर्म व त्यामधील सेंद्रिय कर्ब पिकांच्या एकंदर वाढीसाठी उपयुक्त ठरतात. निंबोळी व निंबोळीपासून तयार केलेली उत्पादने त्यांच्यामधील विविध गुणधर्मांमुळे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.
उत्कृष्ठ दर्जाच्या निंबोळी मधील तेल किंवा अॅझेडीरॅक्टीन वेगळे न करता सुकलेल्या निंबोळीला भरडून भू परिपूर्णा® पावडर तयार करण्यात आलेली आहे.
निंबोळीमध्ये अंगभूत असणारे किटक व बुरशीनाशक गुणधर्म व पिकांना आवश्यक असणारे मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भू परीपुर्णा® मधुन मिळत असल्याने निंबोळी अथवा इतर पेंडींपेक्षा भू परिपूर्णा® चा वापर जास्त फायदेशीर आहे.
घटक | प्रमाण |
अॅझॅडिरॅक्टीन | ७०० पी.पी.एम. |
तेलाचे प्रमाण | ४.० – ५.० % |
सेंद्रिय कर्ब | ३५ – ४० % |
नत्र | ४.० – ५.० % |
स्फुरद | १.० – २.० % |
पालाश | १.० – २.५ % |
प्रथिने | ३० - ३५ % |
या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.
२५ किलो बॅग