भू – समृद्धी® सेंद्रिय खत (मशरूम (अळींबी))

भु समृद्धी® सेंद्रिय खत शेणखताला एक उत्तम पर्याय असून शेणखताच्या तुलनेत भु समृद्धी® सेंद्रिय खत अन्नद्रव्ये, सुक्ष्म जिवाणू व पिक वाढीसाठी लागणार्‍या घटकांनी समृद्ध आहे. भु समृद्धी® सेंद्रिय खत मशरूम (अळींबी) उत्पादन केल्यानंतर मिळणार्‍या कच्च्या मालापासून प्रक्रिया करून तयार केलेले आहे. मशरूम उत्पादन करताना वापरल्या जाणार्‍या पोषक पदार्थांचा समावेश भु समृद्धी® सेंद्रिय खतामध्ये असल्याने हे ईतर सेंद्रिय खतांपेक्षा दर्जामध्ये वरचढ आहे.

मशरूम उत्पादन करताना जे बेड तयार करतात त्यासाठी गव्हाचा भुसा, पोल्ट्री वेस्ट (कोंबड खत), जिप्सम, शेणखत, सोयाबीनचा भुसा, एरंडी पेंड, कोकोपीट इत्यादी पदार्थ वापरले जातात. या बेडवर मशरूम उत्पादन घेताना ह्या पदार्थांच्या मिश्रणाला दोन वेळा प्रत्येकी सात दिवस जिवाणू मिश्रण वापरून कुजविले जाते. त्यानंतर ६० दिवसांनी मशरूमची काढणी केली जाते. काढणी झाल्यानंतर ह्या बेडमधील मिश्रण भु समृद्धी® सेंद्रिय खत बनवताना कच्चा माल म्हणून वापरले जाते.

हे बेड व्यवस्थीत ओले करून त्यावर जिवाणूंची प्रक्रिया करून १२० दिवसांपर्यंत कुजविले जाते. या प्रक्रियेदरम्यान या बेडला दोन वेळा उलटापालट करून मिश्रण केले जाते. या प्रक्रियेनंतर तयार होणार्‍या संपूर्ण कुजलेल्या खतावर पिकांना उपयुक्त असणार्‍या जिवाणूंची प्रक्रिया केली जाते व त्यानंतर १५ ते २० दिवसांनी बारीक चाळणीने चाळून भु समृद्धी® सेंद्रिय खत आपल्यापर्यंत पोचवीण्यासाठी तयार केले जाते.

थोडक्यात भु समृद्धी सेंद्रिय® खत वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाला दिड वर्ष व्यवस्थीतपणे कुजवून, त्यावर उपयुक्त जिवाणूंची प्रक्रिया करून वापरासाठी उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यामध्ये कुठलेही न कुजलेले किंवा अर्धवट कुजलेले पदार्थ शिल्लक रहात नाहीत. परिणामी याचा वापर केल्यानंतर कमीत कमी वेळेत जमिनीमध्ये याचे कार्य सुरू होते.

भु समृद्धी सेंद्रिय® खतामध्ये पिकांना आवश्यक असणारी मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये नैसर्गीकरित्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पिकवाढीसाठी आवश्यक असलेली अ‍ॅमीनो आम्ले, कार्बोनीक आम्ले, संजीवके तसेच विकरे भु समृद्धी सेंद्रिय® खतात उपलब्ध असल्याने पिकांच्या भरघोस वाढीसाठी हे उपयुक्त ठरते.

भु समृद्धी® सेंद्रिय खतामधील घटक

घटक प्रमाण
सेंद्रिय कर्ब १५ – २५ %
नत्र १.० – १.७५ %
स्फुरद (P2O5) १.० – १.५ %
पालाश (K2O) १.० – १.२ %
प्रथिने ७.० – ११ %
कार्बन नत्र गुणोत्तर < २०

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

भु समृद्धी® सेंद्रिय खताचे फायदे

  • भु समृद्धी® सेंद्रिय खत संपूर्णतः कुजलेले भरखत असून हे सेंद्रिय कर्बाने समृद्ध आहे. याच्या वापराने जमिनीच्या सेंद्रिय कर्बात भर पडून उपयुक्त जिवाणूंना अन्नपुरवठा होत असल्याने जमिनीचे जैविक तसेच भौतिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खतामधून पिकांना आवश्यक असणारे सर्व अन्नघटक नैसर्गीकरित्या उपलब्ध होत असल्याने पिकांची व मुळांची जोमाने वाढ होते.
  • अन्नद्रव्यांसोबतच इतर पोषक घटक भु समृद्धी® सेंद्रिय खतामधून मिळाल्याने पिकांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची कीड व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने पाने, फुले व फळांची गळ थांबून फळांना आकर्षक रंग व चमक येते.
  • पिकांच्या आरोग्यात भु समृद्धी® सेंद्रिय खतामुळे सुधारणा होत असल्याने मुळकूज, मर, रोपे सुकणे व पिवळी पडणे यांसारख्या विकारांचे प्रमाण कमी होते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खत कुठल्याही प्रकारच्या सेंद्रिय अथवा रासायनिक खतांमध्ये सहजपणे मिसळता येते.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खत रासायनिक खतांसोबत मिसळून वापरल्याने त्यामधील अन्नद्रव्यांचा विविध कारणांनी होणारा र्‍हास कमी होऊन त्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. परिणामी रासायनिक खतांचा वापर कमी करता येऊ शकतो.
  • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने वाढून अधिक काळापर्यंत जमिनीत ओलावा टिकून रहातो.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या नियमीत वापराने जमिनीचा पोत सुधारतो.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खतामधील उपयुक्त जिवाणू जमिनीचे आरोग्य सुधारण्यास तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यास उपयुक्त ठरतात.
  • भु समृद्धी® सेंद्रिय खताच्या वापराने रसायनांचा वापर मर्यादीत करता येतो. परिणामी निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करताना याचा वापर फायदेशीर ठरतो.

वापरण्याचे प्रमाण

पिक भु समृद्धी® सेंद्रिय खत देण्याची वेळ वापरण्याचे प्रमाण
द्राक्षे एप्रिल छाटणीचे वेळी ३ ते ५ टन प्रती एकर
ऑक्टोबर छाटणीचे वेळी २ ते ३ टन प्रती एकर
केळी लागवडीचे वेळी २ ते ३ टन प्रती एकर
लागवडीनंतर २ ते ३ महिन्यांनी २ वेळा १ टन प्रती एकर
डाळींब ताण सोडल्यानंतर ५ ते २० किलो प्रती झाड
टोमॅटो लागवडीचे वेळी १ टन प्रती एकर
लागवडीनंतर १ महिन्याने ५०० किलो प्रती एकर
ऊस लागवडीचे वेळी २ ते ३ टन प्रती एकर
बांधणी करताना २ ते ३ टन प्रती एकर
पपई लागवड करताना १ टन प्रती एकर
दर २ ते ३ महिन्यांनी १ टन प्रती एकर
कापूस लागवडीचे वेळी २ टन प्रती एकर
कांदा, लसून लागवडीचे वेळी १ टन प्रती एकर
आंबा, काजू, नारळ लागवडीचे वेळी २५ किलो प्रती झाड
दरवर्षी जूनमध्ये २५ किलो प्रती झाड
इतर भाजीपाला लागवडीचे वेळी २ टन प्रती एकर
इतर फळपिके लागवडीचे वेळी २० किलो प्रती झाड
दरवर्षी जूनमध्ये २५ किलो प्रती झाड
अन्नधान्य, कडधान्य व तेलबीया लागवडीचे वेळी १ ते २ टन प्रती एकर

याशिवाय जमिनीतून प्रत्येक वेळी रासायनिक खत देताना भु समृद्धी® सेंद्रिय खत १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता

५० किलो बॅग

Back to Top