पिकांना आवश्यक असणार्या प्रमुख अन्नद्रव्यांपैकी स्फुरद व पालाश ही महत्वाची अन्नद्रव्ये आहेत. मुळांच्या तसेच फुलांच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज असते. त्याचबरोबर फळांची गुणवत्ता, वजन व एकूण उत्पादनासाठी पालाश आवश्यक असते. रासायनिक स्फुरदयुक्त खतांमधील बहूतांश स्फुरद जमिनीमध्ये स्थिर होऊन त्याची उपलब्धता कमी होते. एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी उत्तम सेंद्रीय पर्याय उपलब्ध करुन देणे महत्वाचे ठरते.
जय फॉस (पोटॅश) संपूर्णतः नैसर्गिक उत्पादन असुन सेंद्रीय स्वरुपातील २०-२५ % स्फुरद व १५-२० % पालाश यामधुन पिकांना उपलब्ध होतो. याशिवाय दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचे भरपूर प्रमाण असल्याने एक पूर्णतः संतुलीत सेंद्रीय खत म्हणून जय फॉस (पोटॅश) उपयुक्त ठरते. यामधील सर्व अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरुपात असल्याने ते दिर्घकाळापर्यंत गरजेनुसार पिकांना शोषणासाठी उपलब्ध होत राहतात.
विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, फुले तसेच भाजीपाला पिकांसाठी जय फॉस (पोटॅश) एक उत्तम पर्याय आहे.
घटक | प्रमाण |
स्फुरद | १५ – ३५ % |
पालाश | १२ - २० % |
या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.
२५ किलो बॅग